E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
जीनोम वाणामुळे तांदळाच्या उत्पादनात वाढ
Samruddhi Dhayagude
23 May 2025
वृत्तवेध
भारताने देशात प्रथमच जीनोम वर्धित तांदळाच्या दोन नवीन जाती सादर केल्या आहेत. या नवीन वाणांमुळे उत्पादनामध्ये तीस टक्के वाढ होईल आणि पिके पिकण्यास सध्याच्या वाणांच्या तुलनेत १५ ते २० दिवस कमी लागतील. तांदळाच्या या नवीन जातींना (कमला-डीआरआर भात-१०० आणि पुसा डीएसटी तांदूळ १) कमी पाणी लागेल. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या वतीने संशोधित या वाणांमुळे वातावरणात हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होईल. ब्रीडर, फाउंडेशन आणि प्रमाणित बियाण्यांचे सामान्य चक्र पूर्ण केल्यानंतर या जाती शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान चार ते पाच वर्षे लागतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांसाठी या जातींची शिफारस करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी भारताने एसडीएन १ आणि एसडीएन २ जीनोम-वर्धित जातींना पर्यावरण संरक्षण कायद्या(ईपीए)च्या नियमन ७-११ मधून धोकादायक सूक्ष्म जीव किंवा अनुवंशिकरित्या सुधारित जीव किंवा पेशींचे उत्पादन, वापर, आयात किंवा निर्यात आणि साठवणुकीसाठी सूट दिली होती. एसडीएन-१, एसडीएन २ आणि एसडीएन ३ या पिकांमध्ये जीनोम समृद्ध करण्याच्या पद्धती आहेत. आज सादर केलेल्या सर्व नवीन भाताच्या जातींमध्ये जीनोम समृद्धीचा वापर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कृषी पिकांमध्ये जीनोम समृद्धीसाठी ५०० कोटी रुपये वाटप केले होते. अनुवंशिक समृद्धीच्या तुलनेत जीनोम समृद्धी हे एक नवीन क्षेत्र आहे. ‘आयसीएआर’चे महासंचालक डॉ. मांगी लाल जाट म्हणाले, ‘तांदळाव्यतिरिक्त, सुमारे २४ इतर अन्न पिके आणि १५ बागायती पिके आहेत, जी जीनोम समृद्धीच्या विविध टप्प्यात असून हळूहळू बाजारात आणली जातील. सादर केलेल्या वाणांनंतर आम्ही लवकरच त्यांच्या ‘आयपीआर’ नोंदणीसाठी अर्ज करू. सुरुवातीला सरकारी कंपन्यांकडून नवीन जीनोमवर्धित बियाणे विकले जाईल. ‘आयसीएआर’ने २०१८ मध्ये राष्ट्रीय कृषी विज्ञान निधीद्वारे भातामध्ये ‘जीनोम एनहान्समेंट रिसर्च प्रोजेक्ट’ सुरू केला होता. सुरुवातीला शेतकर्यांनी सर्वाधिक प्रमाणात घेतले जाणारे तांदळाचे वाण निवडले होते. ते देशभरात नव्वद लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात घेतले जाते. सांबा मन्सुरी ही जात खास गुणवत्तेसाठी आणि चांगल्या किमतीसाठी ओळखली जाते; परंतु हवामान प्रतिकारशक्तीमध्ये ती चांगली मानली जात नाही.
Related
Articles
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर